Monday, June 22, 2009

ती:तो

ती: ए मी कशी दिसतेय?
तो: सुंदरच दिसतेस की .................असं सांगु की खरं सांगु?

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? याचा अर्थ मला आज तोवर कळाला नाहिये. मागच्या पिढीचं एक ठिक आहे. त्यांच्या साठी गोऱ्यांपासुन मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होत. म्हणजे निदान दररोज राजकर्ते म्हणुन ते न दिसणे असा त्याचा आता अर्थ लावता येतो. पण माझा मुद्दा हा देशाबद्दलच्या स्वातंत्र्याचा नाहीच. मला स्वातंत्र्य वैयक्तीक पातळीवर शोधायचयं. मी शोधतोय देखील पण आश्चर्य ते हे कि प्रत्येक वेळेस मला ते मृगजळच  वाटते. 

जगण्यात सर्वात मोठं पारतंत्र्य म्हणजे विचारचं. आपल्या विचारांवरही आपला हक्क नसावा ह्यासरखा दुसरं दुर्दैव म्हणता येणार नाही. अगदी लहानपणी शाळेच्या निवडीपासुन छोट्या छोट्या निर्णयापर्यंत हे असच घडतं. कोणी म्हणेल, ह्यात वाद घालण्यासारखं काही नाही. मान्य. पण ह्यापैकी किती निर्णयांचा नंतर डोळसपणे विचार तरी होतो, हा मुद्दा. थोडक्यात काय तर जे विचारांचं तेच निर्णयाचं. आपले नेर्णय आपल्याला न घेता येणे हे पण अर्धनशिबीचं. मग तुमच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असो वा नसो. तसं ही क्षमता तपासण्याची संधी पण ह्या पारतंत्र्यात मिळत नाहीच. आणि आपण कर्तेधर्ते झाल्यावरही हे चालुच असते. कधी सहकाऱ्याच्या, अधिकाऱ्याच्यारुपाने हे पारतंत्र्य आपल्या आयुष्यात डोकवतेच तर कधी निव्वळ आपल्या अनभिज्ञ्यतेमुळे
 हे घडते.

मग प्रश्न उरतो तो हा कि हे पारतंत्र्य लादत कोण? कोण आपल्या मनावर साम्राज्य करतो आणि आपल्याला ते आयुष्यभर कळतदेखील नाही? आणि ह्या पारतंत्र्याची आपल्याला इतकी सवय का झाली?

प्रश्न जितके कठीण उत्तरे तितकी सोपी असं कोणी  तरी म्हणलं आहे. पण ते काही इथे लागु पडत नाही हे उघड वाटते. तेव्हा माझा हा खुला सवाल आहे, ह्याला आपापल्या अनुभवानुसार आणि मान्यतेनुसार उत्तर कळवावे आणि माझ्या विचारांना दिशा द्यावी, ही विनंती.

Wednesday, June 10, 2009

कोसला: एक चिंतन

कोसला पुन्हा एकदा......चार वर्षांनंतर आज कोसला परत वाचलं...परत मला ते "माझं" वाटलं...म्हणजे एखादी व्यक्ती अस्सं इतकं आपल्या जीवनाबद्दल कस्सं लिहु शकते? ते पण काहीही ओळखं नसताना?तशी चार वर्षांमध्ये माझ्या ऎहीक आणि वैयक्तिक जीवनात फ़ार फरक पडलाय असं नाही...हो एक मात्र नक्की अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर तीच काय ती कमाई...

माझी ओळख वाचक म्हणुन नाही हे आधीच मान्य केलयं. त्यामुळे वाचनाचा वेगही साधारणचं. पण आज चक्कं सलग दोन बैठकीत ह्या पुस्तकचा फडशा पाडला...कारण आज मला न जाणो का हे अधिकच माझ्या जीवनाबद्दलचं वाटलं म्हणुन असेल कदचित...
सांगवीकर हा थोरच..

मी माझ्या मित्रांना नेहमी म्हणतो, कि मेरी जिन्दगी खुली किताब है (तसा काहिंना हा आक्षेपार्ह मुद्दा वाटतोच) पण मनातील गुंता कोणाला सांगता येत नाही..तो एक तर अनुभवावा तरी लागतो नाही तर विसरावा तरी...ह्याच गुंत्याच्या अनुभवाचे दर्शन मला परत सांगवीकरांकडुन झाले.

उदाहरणार्थ, समोरच्यावर कारण (आणि विषेशतः स्वभाव) नसताना चिडणे, जुन्या नात्यांना उगाच फाटे फोडणे, जवळच्या मित्रावर तो चांगला आहे हे माहित असुनही वैतागणे, नव्या ओळखीला जवळ करुन नको तेवढा विश्वास करणे वैगेरे ह्या त्याच्या गोष्टी त्याच्या की माझ्या ???.

वेळापत्रक तयार केलं, पाच महिन्याचा अभ्यास दीड महिन्यात...ह्या वाक्यासाठी पांडोबाला माझं वैयक्तीक Nobel केव्हाच मिळालंय...

समजातील हलाहल आणि मनातील चलबिचल ह्या एकमेकांना इतक्या कशा पोषक ठरव्या??? खोल कोपऱ्यातील दुःख असं मुसंडी मारुन का परत जीवनात डोकवतं? आणि प्रत्येक खेपेला अधिक त्रासदायी का बनतं?काहि प्रश्न असे अनुत्तरीतच का रहावे?

होस्टेल वरचे तर कितीतरी विचार (मी कधी काळी न लिहिलेल्या) माझ्या डायरीतुन उचलले वाटतात. ही डायरी अजुन एक थोर । माझ्या एका Non-मराठी मित्राला हे मी सांगीतले, तर तो म्हणाला, उसमे क्या है? चेतन भगत की बुक मे भी वही है....पण मला माहित आहे चेतन नामक स्व-घोषीत कादंबरीकाराने केवळ घटना नोंदविल्या आहेत. इथे तर मनाचा बाजार मांडला आहे. असो.

हे लिखाण केवळ एका ठिकाणी(म्हणजे माझ्या मनाशी संलग्नता साधताना) मार खाते,शेवटाला...

न जाणो का पांडु नियतीला शरण जातो..निदान तशी वाटचाल तरी करायला लागतो. अनुभवातुन आणि परस्थितीतुन अर्जित केलेलं ज्ञ्यान एकीकडे ठीक आणि त्यातुन प्रगल्भ बनुन जीवनच्या नवीन वाटा ढुंढाळणं पन ठीक. पण ह्यापैकी कोणतिही एक किंवा दोन्ही गोष्ट काहि नियतीच्यासमोर पांढरे निशाण उभारण्याचे कारण होवु शकत नाहीच. तेव्हा सांगवीकर आणि माझ्यातला फरक तिथेच.

असे असुनही ही कलाकृती माझ्या Favorite books पैकी झाली आहे हे वेगळे सांगावयास नकोच. लेखक मला ओळखत नाही, माजे जीवन त्यांना माहित नाही. पण त्यांना एकंदर जीवन कळाले आहे म्हणुन ही श्रेष्ठ निर्मिती. अशा कलाकृतीला आणि साहित्यिकाला सलाम.!!!